पंढरपूर ता. प्रतिनिधी बिरदेव केंगार
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी गावामध्ये गेली सात वर्ष झाली, केसकरवाडी गावचे मा तंटामुक्ती अध्यक्ष संजय मासाळ यांनी गावातील दलित वस्ती मधील लोकांना साखर वाटण्याचा संकल्प केला होता आणि प्रत्येक वर्षी तो ते नियमाप्रमाणे या दलित वस्ती मध्ये साखर वाटून या गरीब लोकांची दिवाळी गोड करतात. तसेच याही वर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच किलो साखर देऊन या दलित वस्तीमधला आंनद दुगुणित केला.
यावेळी मा. ग्रामपंचायत सदस्य तानाजी केसकर, मा. ग्रामपंचायत सरपंच आब्बास मुजावर , ग्रामपंचायत सदस्य गणेश केसकर, जगन्नाथ चोरमले, बाळू मुजावर,दत्तात्रय गोफने, वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चिटबॉय बाबासो चोरमले,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष उत्तम मासाळ,विजयकुमार मासाळ, दत्तात्रय मासाळ,मायाप्पा बिरलिंगे, भीमराव जावीर,सहदेव ढोबळे, देविदास जावीर,अर्जुन जावीर, महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना संजय मासाळ म्हणाले कि हा उपक्रम पुढल्या वर्षी खूप आगळावेगळ्या पद्धतीने करू या.हि दिवाळी आपणास सुख,समृदीची जावो हीच शुभेच्छा.