मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
वारसा हा अभिमानाने मिरवला की तो आपोआपच जतन होतो हा दृष्टिकोन समोर ठेवून बालविकास विद्या मंदिर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शुभदा राणे यांनी रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज
संस्थेच्या हीरक महोत्सवा निमित्त *शिवगाथा* व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्याख्याते महेंद्र सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यावयाची तत्त्वे, गुण व विद्यार्थ्यांनी त्यांचा इतिहास हा फक्त अभ्यासापुरता व गुणांपुरता मर्यादित न ठेवता इतिहास समजून घेऊन त्याप्रमाणे आत्ताच्या युगात त्याचा प्रत्यक्षात उपयोग कसा करावा हे सांगितले.
इतिहासातील राजा आताही जनतेच्या मनावर राज्य करतो हे भारतीय नौदलाने राजमुद्रा बोधचिन्हावर घेऊन सिद्ध केले अशा या रयतेच्या राजाला बालविकास परिवाराकडून मानाचा मुजरा .
या कार्यक्रमास संस्थेचे उपकार्याध्यक्ष सहदेव सावंत यांनी संस्थेच्या ध्येय धोरणाबाबत उपस्थितांना संबोधित केले.
चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक , कर्मचारी, विद्यार्थी, पालक व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका अर्चना जाधव यांनी केले. शिक्षिका विशाखा तांबे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.