सोलापूर प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कैलासवासी वि. गु. शिवदरे प्रतिष्ठान सोलापूर भुसार आडत व्यापारी संघ श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर व सिद्धसंग प्रतिष्ठान यांच्यावतीने जिल्ह्यातील वंचित विद्यार्थिनींना एकूण 75 सायकल प्रदान कार्यक्रम माणिक चौक येथील मानाचा आजोबा गणपती समोर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी राजशेखर शिवदारे प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे, डॉक्टर चनगोंडा हवीनाळ, सुरेश चिक्कळ्ळी, पशुपती माशाळ, तुकाराम काळे, संगम रघोजी, अण्णासाहेब कोठली, नितेश भंडारी, एस आर पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानाचा आजोबा गणपतीची महापूजा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले व वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आला तदनंतर वंचित विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली.
याविषयी अधिक माहिती वि. गु प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेबांनी जिल्हयातील वंचित मुलींसाठी सायकल बँकेची योजना सुरू केली वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने 25 सायकली तसेच भुसार आडत व्यापारी सिद्धेश्वर मार्केट यार्ड, सिद्धसंग प्रतिष्ठान सर्व मित्रमंडळी यांच्या वतीने स्वामी साहेबांच्या हाकेला प्रतिसाद म्हणून 75 सायकली ग्रामीण भागातील मुलींना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील मुलींना शाळा घरापासून लांब असते जाताना येताना त्रास होतो वेळ भरपूर होतो. म्हणून अनेक मुली शाळेला जात नव्हते म्हणून त्यांची अडचण ओळखुन स्वामी साहेबांनी 7000 हजार सायकली गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विद्यार्थिनींना शाळेला येण्याजाण्यासाठी सोयीचे होईल त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थिनींचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सायकल परत द्यायचे आहे तीच सायकल परत दुसऱ्या गरजू विद्यार्थिनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल दिलीप स्वामी साहेबांचे अभिनंदन करतो असे राजशेखर शिवदारे म्हणाले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणालेकी, वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान, भुसार आडत व्यापारी संघ, सिद्धसंग प्रतिष्ठान आणि त्यांचे मित्रमंडळी यांच्या माध्यमातून अतिशय चांगला असा उपक्रम या सर्वांच्या माध्यमातून होत आहे शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थिनींना याचा अभ्यासाकरिता मोठा फायदा होणार आहे यामुळे आपला अभ्यासाचा दिनक्रम व शाळेच्या वेळेची बचत होते या बचतीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात करा असे म्हणाले.