श्रीशैल गवंडी अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
येथील श्री शहाजी प्रशालेची विद्यार्थिनी कु.प्रणया लक्ष्मण साळुंके हिने मार्च २६ मध्ये एस.एस.सी.पुणे बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालांत परिक्षेत उज्वल गुणांनी उत्तीर्ण होवून तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले आहे.
या उज्वल कामगिरी बद्दल येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी कु.प्रणया साळुंखे हिचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी बोलताना नगरसेवक महेश इंगळे म्हणाले की कु.प्रणया साळुंखे हिने दहावीत उज्वल यश संपादन केल्याने तीच्या भावी जीवनाचा पाया उज्वल यशाने रोवला गेला आहेच, पण अलीकडील काळात तालुक्यात साक्षरतेचे प्रमाणही वाढत असल्याने ही बाब अत्यंत आनंदाची आहे, जेणेकरून भविष्यातही अक्कलकोट तालुक्याचे नांव शैक्षणिक पटलांवर उज्वल होत राहील असे मनोदय व्यक्त केले.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, मा.नगरसेवक रामचंद समाणे, परधनेश साळुंखे, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार आदींनी कु.प्रणया साळुंखे हिचे कौतुक केले व तीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


