जोगेश्वरी प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
जोगेश्वरी स्टेशन येथील दक्षिण दिशेकडील सरकते जीने वारंवार बंद स्थितीत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.महिन्यातून किमान 8 ते 10 दिवस हे जिने बंद असल्याने किमान ५० पायऱ्या चढून जाताना वयोवृद्ध, दिव्यांग विद्यार्थी, नवजात शिशुना स्तनपान करणाऱ्या माता, गरोदर महिला, विद्यार्थी, आजारी रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया झालेले लोक यांना याचा अधिक त्रास होत आहे.
जिने बंद असल्याने पायऱ्या चढून जाताना अनेकांना दम लागतो.रेल्वे प्रशासनाने ज्या कंपनीला जिने देखभाल दुरुस्ती काम दिलेले आहे त्यांनी महिन्यातून किती दिवस आणि कोणत्या दिवशी दुरुस्ती मेंटेनस करणार आहेत त्याच्या तारखा मोठ्या अक्षरात फलकावर महिन्याच्या सुरुवातीलाच लावणे गरजेचे आहे.
उठसूठ मनमानी करून या कंपन्या देखभालीच्या नावाखाली जिने केव्हाही आणि कधीही बंद ठेऊ शकत नाहीत.स्टेशन मास्तरांनी देखील या कंपन्यांवर लक्ष ठेवायला हवे. जिने बंद असणारी परिस्थिती केवळ जोगेश्वरी पूर्ती मर्यादित नसून अनेकवेळा विविध स्टेशन वरील जिने बंदच असतात.
याकामी रेल्वे प्रशासनाने योग्य ती दखल घ्यायला हवी तसेच जोगेश्वरी येथे नव्याने बांधलेली लिफ्ट देखील लवकर सुरू करावी अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी केली आहे.