घातक मांजावर सरसकट बंदी हवी
१४ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावेळी आकाशात पतंग उडविण्याची मोठी क्रेझ असते.परंतु पतंगासाठी वापरण्यात येणारा धागा म्हणजेच मांजा हा काचेचे तुकडे, खर, नायलॉन, प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक पदार्थांपासून तयार केलेला असतो आणि तो खूपच धारदार असतो.अशा वस्तू वापरून तयार करण्यात येणाऱ्या मांजा वापरण्यास हरित लवादाने बंदी घातलेली आहे.असे असले तरी संक्रांतीच्या आठवड्यात तो सर्रास वापरण्यात येतो.आणि यामुळे पशू पक्षी माणसं यात अडकली जाऊन त्यांच्या जीवावर बेतते.अनेकवेळा हे सर्व गंभीर जखमी होतात तर कित्येकांचा जीव जातो.बाईकवर बसलेल्या लोकांना आणि आकाशातील पक्ष्यांना याचा जास्त त्रास होतो.अनेकांचे गळे चिरले जातात, तर असंख्य पक्ष्यांच्या पंखात मांजा अडकल्याने ते जायबंदी होतात, त्यांना तो मांजा सोडविता येत नाही आणि पर्यायाने ते मरतात.या मांज्या चे विघटन लवकर होत नाही, पशूनी देखील तो खाल्ला तर त्यांनाही इजा होते.तेव्हा अशा या जीवघेण्या मांजावर सरसकट बंदी असायला हवी.तसेच पतंग प्रेमींनी देखील साधा आणि कोणालाही इजा होणार नाही असा धागा वापरून पतंग उडवायला हवेत.
गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व