एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधेचां खणखणीत ईशारा
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर तेज न्यूज
इगतपुरी व त्रंबकेश्वर हे दोन्ही तालुके आदिवासी बहुल आहे. या दोन्ही तालुका मिळुन संयुक्त इगतपुरी - त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे.जो वर्षानुवर्ष अनुसुचित जमाती साठी राखीव आहे.मात्र याचा लाभ खर्या आदिवासी बांधवाना मिळत नसल्याचा सनसनाटी आरोप एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी केला आहे.स्थानिक भुमिपुत्र इच्छुकानां येथे डावलले जात असुन बाहेरुन उमेदवार आयात केले जाते आहे. महाराष्ट्रातील लांबीने सर्वात मोठा असणार्या या विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवाराचीं वानवा आहे का असा सवाल ही मधेनीं केला आहे.
ईगतपुरी- त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढवण्यासाठी मोठी भाऊगर्दी पहायला मिळत आहे. यात विदयमान आमदार हिरामन खोसकर यांचेसह माजी आमदार सौ.निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, शिवराम झोले व पांडुरंग गांगड यांचीही नावे चर्चेत आहे.
या शिवाय ईगतपुरी पंचायत समिती चे माजी सभापती गोपाळा लहांगे यांनी स्थानिक उमेदवारीच्या मुद्दयावर भर देत आपली इच्छा जाहिर केली आहे.या शिवाय त्यांनी संपुर्ण मतदार संघ पिंजुन काढला आहे. लहांगे यांचेसह कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे माध्यमातुन युवा चेहरा लकी जाधव यांनीही जोरदार मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. याशिवाय घोटी कृ.उ.बा.चे संचालक तुकाराम वारघडे यांचेही नाव भावी आमदार म्हणुन चर्चेत आहे.
सुशिक्षित व वैदयकीय सेवा देणारे शरद तळपडे, एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे, माजी आमदार पुत्र विलास झोले, बाळासाहेब झोले, माजी आमदार विठ्ठल घारे यांच्या स्नुषा श्रीमती अनिता घारे, माजी जि.प.सदस्य कावजी ठाकरे,युवा चेहरा राजु गांगड व घोटी कृ उ बा चे संचालक अँड.मारुती आघाण आदी नांवाचीं खमंग चर्चा सुरु आहे.
याशिवाय नाशिक मनपा नगरसेविका उषा बेंडकोळी व चंद्रकांत खाडे यांनीही दंड थोपटले आहे.दरम्यान यात एका नवीन चेहर्याची भर पडली असुन त्यांची खमंग चर्चा सुरु झाली आहे. ते आहेत वैभव ठाकुर.
दरम्यान सर्वच इच्छुक मंडळी चांगलीच सक्रिय झाली आहे.कुणी संपर्क दौरे, विविध शिबिरे, सोशल मिडीया वा बँनर आदीच्या माध्यमातुन दंड थोपटले आहेत. एकुण सन २०१९ मधील दुरंगी लढतीसारखे चित्र यंदा दिसणार नाही.यंदा या मतदारसंघात बहुरंगी व चुरशीच्या लढतीची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघ हा कांग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.कांग्रेसच्या दारुण परिस्थितीतही या मतदारसंघाने कांग्रेसचीच पाठराखण केली.अगदी मोदी लाटेतही.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातुन ही जागा कांग्रेस ला सुटेल यात तीळमात्र शंका नाही. कांग्रेस कडुन या मतदार संघात विदयमान आमदार हिरामन खोसकर, गोपाळा लहांगे, वैभव ठाकुर, लकी जाधव , उषा बेंडकोळी आदी नावे प्रामुख्यानें चर्चेत आहे. या शिवाय सदर जागा उ.बा.ठा.गटाला सोडावी अशीही मागणी जोर धरत आहे.तर तसे न झाल्यास सौ.निर्मला गावित यांनाच कांग्रेस मध्ये घेऊन उमेदवारी देण्याबाबतही खलबते सुरु असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे आमदार हिरामन खोसकर यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आदीच्यांही भेठी घेत बंद दाराआड चर्चा केल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. आमदार हिरामन खोसकर हे जाहिररीत्या काहिही बोलायला तयार नसले तरी कदाचित कांग्रेस ने डावलल्यास अन्य पर्यायाचीही त्यांनी चाचपणी केल्याची आतील वर्तुळात चर्चा आहे.
बोगस आदिवासी तथा उपरे उमेदवार नको- मधे
आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काही स्वत:ला आदिवासी म्हणवुन घेणारे बोगस उमेदवारही धनाच्या बळावर रिंगणात उतरत आहेत.अशा बोगस आदिवासी उमेदवारानां जनता धडा शिकवेल.याच बरोबर उपरे उमेदवार लादण्याचाही प्रयत्न होऊ नये.
भगवान मधे.संस्थापक अध्यक्ष एल्गार संघटना