भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेत करोडो रुपयाचा घोटाळा झाला असून या प्रकरणास आठ दिवस झाले तरी बँकेकडून खातेदार असतात कोणत्याही प्रकारचा खुलासा दिला गेला जात नाही त्यामुळे बँक खातेदार चिंतेत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील युनियन बँकेतील कर्मचाऱ्यांनी 1 कोटी 28 लाख 27 हजर 800 रुपयाचा घोटाळा प्रकरणी फिर्याद नोंदवली आहे.पण अजून किती रुपये चा नक्की घोटाळा झाला आहे ? याबाबत बँकेकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा केला जात नाही. तसेच झालेल्या घोटाळ्यातील रक्कम खातेदाराच्या खात्यात कधी जमा करणार हाही खातेदारांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्याचबरोबर त्या रकमेचे व्याज ही जमा करणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे खातेदार मोठ्या चिंतेत पडला आहे. याबाबत बँकेची संपर्क साधण्याची प्रयत्न केला असता बँकेचे रिजनल मॅनेजरच सर्व माहिती देतील आम्हाला काही माहीत नाही असे बँकेतील संबंधित अधिकारी माहिती देत आहेत. बँकेच्या रिजनल मॅनेजर शी संपर्क साधण्यासाठी फोन किंवा मोबाईलची सेवा ही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही त्यामुळे खातेदारांना बँकेच्या विश्वासा बद्दल शंका उत्पन्न होत आहे.
आजपर्यंत कोणावर व कसलीही कारवाई झालेली दिसून येत नसल्यामुळे बँकेच्या गलथान कारभाराची चर्चा खातेदाराकडून केली जात आहे. बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष देऊन खातेदारांना घोटाळ्या बाबत खुलासा देऊन विश्वास उत्पन्न करून द्यावा अशी खातेदाराकडून मागणी केली जात आहे.