विरपे परिवारास मदत करण्याची घेतली जबाबदारी
मोहोळ प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे 2 दिवसांपूर्वी एका संस्थेच्या शाळा असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी मोहोळ तालुका शिवसेनेचे संभाव्य उमेदवार व उद्योजक राजू खरे हे ठिकाणी आले असता,त्याच कार्यक्रमादरम्यान मोहोळ तालुका शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख समाधान खंदारे यांनी नरखेड गावातील असलेल्या कैलासवासी सिद्धेश्वर विरपे यांना एका विषारी सापाने दंश केले असता त्यांचा त्यावेळी आकस्मिक निधन झाल्याचं सांगितले.
त्याचक्षणी तत्काळ राजू खरे यांनी त्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली, भेट घेत असताना त्या ठिकाणी वीरपे कुटुंबाची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जाणवत होती, घरातूनच ती माय-माऊली डोकावून पाहिले असता समोर अनोळखी माणसे दिसून येताच दरवाजातूनच डोळ्यांमध्ये भरलेल्या अश्रूंनी जणू काही सर्वच सांगून जात होते, कुटुंबाचा कर्ता धरता पुरुष गेल्यावर घर आणि संसार उघड्यावर पडतं याची प्रचिती समोर उभी होती, त्या माऊलीने असं काही सांगितले की समोरच्याच्या डोळ्यांत देखील अश्रू व कंठ दाटून आले, ते असे की कैलासवासी सिद्धेश्वर वरपे यांची एक मुलगी खूप हुशार बारावीला 82 टक्के मार्क पडले असताना देखील तिच्या पुढच्या शिक्षणाला पैसा नाही, आई मोलमजुरी करत घर चालवते, ना कुणाचा आधार, ना कोणाची मदत... असंही म्हटलं जातं की जेव्हा सगळे पर्याय संपतात किंवा पाठ फिरवतात तेव्हा मात्र साक्षात परमेश्वरच समोर उभा राहतो,विरपे कुटुंबाला देखील असाच एक साक्षात त्यांच्यासाठी देवच भेटला.. आणि तो देव आपल्या पायाने चालत त्यांच्या घरी पोहोचला ते म्हणजे राजू खरे नावाचा माणूस..
ज्याला आता मोहोळ तालुक्यातील लोक भावी आमदार म्हणून संबोधले गेले,हो तेच राजू खरे ज्यांनी रस्ते नाही त्या लोकांना रस्ते व ज्यांना पाणी नाही त्या लोकांसाठी पाणी देण्याचं कार्य घडताना दिसून येते.. तसं पाहिलं तर काही माणसाजवळ पैसा अमाप आहे पण दानत मात्र नसल्याचं चित्र आपण पाहतोय.. माणूस म्हणून घेतलं जातं पण माणुसकी कुठेच शिल्लक नसतं.. मात्र या उलट राजू खरे यांच्याकडे दया,करुणा आणि दातृत्व या भावना त्यांच्यामध्ये असल्याचं ते याआधीही त्यांच्या कृतीतून दिसून आले.. काही नेते डोळ्यापुढे मतपेटी ठेवून पांढरे कपडे घातलेले अनेक पुढारी गावात किंवा तालुक्यात आश्वासनाची खैरात करीत असतात.. यामध्ये काहीजण कोरडी सहानुभूती दाखवत पुढे निघून जातात,मात्र राजू खरे यांनी तसे न करता विरपे कुटुंबाला धीर तर दिलाच शिवाय त्यांनी आपल्या खिशातून पन्नास हजार रुपये विरपे कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले,अन् एवढ्यावरच न थांबता त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी देखील आपल्या खांद्यावर घेतली, आणि शेवटी काही गरज पडली तर फक्त हाक द्या.. असं म्हणताच कुटुंबातील सदस्यसहित इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांना देखील अश्रू अनावर झाले, नावाप्रमाणेच राजा नावाचा देव माणूस मोहोळ तालुक्यातील असंख्य कुटुंबाच्या मदतीला जाऊन जाताना दिसून येते, पिडीत कुटुंबाच्या घरी साक्षात परमेश्वरच प्रकट झाला अशी भावना देखील कुटुंबाची होते, त्यामुळे साक्षात राजू खरे यांच्या रूपाने विटेवर उभा राहिलेला पांडुरंगच त्यांच्या कार्याने जाणवत असल्याचे देखील काही नागरिकांनी बोलून दाखविले.