धाराशिव प्रतिनिधी
भारत राष्ट्र समिती चे प्रमुख व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे प्रमुख नेते माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांच्या नेत्रत्वात ॲड. विश्वजीत शिंदे यांनी भारत राष्ट्र समिती मध्ये हैद्राबाद, तेलंगणा येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निवासस्थानी प्रवेश केला आहे. ॲड. विश्वजीत शिंदे यांच्या वर धाराशिव जिल्ह्याची जवाबदारी देण्यात आली असुन ॲड. विश्वजीत शिंदे यांना धाराशिव जिल्ह्याच्या समन्वयक पदी नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्ती बदल ॲड. विश्वजीत शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्राचे जेष्ठ नेते माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे आणि महाराष्ट्र राज्याचे किसान प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांच्या शिफारशी वरुन श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या आदेशाने भारत राष्ट्र समिती चे राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशु तिवारी यांच्या सहिने महाराष्ट्रातील ६ विभागाचे समन्वयक व ३६ जिल्ह्याचे समन्वयक यांची नियुक्ती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मराठवाडा विभागाच्या समन्वयक पदी सोमनाथ थोरात व दत्ता पवार, अमरावती विभागाच्या समन्वयक पदी निखिल देशमुख व डॉ. सुभाष राठोड, नागपूर विभागाच्या समन्वयक पदी माजी आमदार चरण वाघमारे व माजी आमदार बाळासाहेब वाघमारे, नाशिक विभागाच्या समन्वयक पदी नाना बच्चाव व संदिप कुटे, पुणे विभागाच्या समन्वयक पदी बी. जे. देशमुख व भागिरथ भालके, मुंबई विभागाच्या समन्वयक पदी विजय मोहीते व माजी आमदार दिगंबर विशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच मराठवाडा विभागात जिल्हाला समन्वयक म्हणून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासाठी आण्णासाहेब माने व अशोक भातपुडे, नांदेड जिल्ह्यासाठी बाबाराव कदम व नागनाथ घिसेवाड, लातुर जिल्ह्यासाठी लक्ष्मणराव वनगे व मल्लिकार्जून करदरेलकर, धाराशिव जिल्ह्यासाठी ॲड. रुपेश माडजे (औसा) व ॲड. विश्वजीत शिंदे, बिड जिल्ह्यासाठी दिलीप गोरे व कुलदिप कारपे, जालणा जिल्ह्यासाठी प्रविण फुके व प्रल्हाद मोहीते, परभणी जिल्ह्यासाठी पवण कारकर व सुधिर बिंदु, हिंगोली जिल्ह्यासाठी संतोष गव्हाणे व डॉ. संजय लोंढे हे समन्वयक नेमले आहेत.
पुणे विभागात जिल्ह्याना समन्वयक पुणे जिल्ह्यासाठी राहुल काळभोर व हलसुरे, सांगली जिल्ह्यासाठी बाळासाहेब पाटील व आशिष शिंदे, सातारा जिल्ह्यासाठी विश्वास जाधव व भगत भिसे, सोलापूर जिल्ह्यासाठी ज्ञानेश्वर जावळेकर व नितीन भोसले, कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवाज बागसू व संकेत देशमुख हे आहेत.
नाशिक विभागात जिल्ह्यांना समन्वयक नाशिक जिल्ह्यासाठी डॉ लक्ष्मण साबळे व रामचंद्र निकम, नंदुरबार जिल्ह्यासाठी संतोष माळी व रुपेंद्र पाटील, जळगाव जिल्ह्यासाठी देवेंद्र वऱ्हाडे व जगन्नाथ बाविस्कर, धुळे जिल्ह्यासाठी अविनाश पाटील व ओंकार पाटील, अहमदनगर जिल्ह्यासाठी मयूर पटारे व शरद पवार हे आहेत.
अमरावती विभागात जिल्ह्यांना समन्वयक अमरावती जिल्ह्यासाठी रामेश्वर कापसे व हरिषद ढोणे, अकोला जिल्ह्यासाठी प्रदीप गोवाडे व आकाश हिरोवाले, बुलढाणा जिल्ह्यासाठी पुरुषोत्तम इंगळे व राजेश लहाने, यवतमाळ जिल्ह्यासाठी राजू तोडसाम व सतीश दरेकर, वाशिम जिल्ह्यासाठी सुनील लहाने व श्रीधर देवरे हे आहेत.
मुंबई विभागात जिल्ह्याला समन्वयक मुंबई जिल्हासाठी श्रीनिवास सुलगे व देवानंद नगेला, मुंबई सबबर्ण संजय निंबाळकर व संभाजी काशीद, ठाणे जिल्ह्यासाठी मकसूद खान व डॉ. प्रकाश भनग्रत, पालघर जिल्ह्यासाठी ॲड. राहूल ठाकरे व नरेंद्र चौधरी, रायगड जिल्ह्यासाठी महेश खाडे व रमेश देवरुखकर, रत्नागिरी जिल्ह्यासाठी मिथिलेश देसाई व गणेश देवरूखकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुपेश पाटील व महादेव सावंत हे आहेत.
नागपूर विभागात जिल्ह्यांना समन्वयक नागपूर जिल्ह्यासाठी रविकांत खोब्रागडे व मुरलीधर भारे, भंडारा जिल्ह्यासाठी व्यंकटेश मेश्राम, चंद्रपूर जिल्ह्यासाठी माजी आमदार बाळासाहेब साळुंखे, आलीकीरा वंशकृष्णा व दिलीप पालेवार, गडचिरोली जिल्ह्यासाठी दीपक अत्राम व अशोक पुरिदेवार, गोंदिया जिल्ह्यासाठी प्रदीप दुबे व प्रभुदास केलुड, वर्धा जिल्ह्यासाठी मनीष नांदे हे आहेत.
' आपकी बार किसान सरकार ' हा नारा देत भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल घेऊन आली आहे. तेलंगणा राज्यात केलेला विकास व तेलंगणा राज्यातील संपुर्ण पणे थांबलेल्या शेतकरी आत्महत्या, तेलंगणा राज्यात लागु असलेले १३% स्वतंत्र मराठा आरक्षण, शेतकर्यांना कायमस्वरुपी मोफत पाणी व विज, पेरणी पुर्वी शेतकर्यांना प्रति हेक्टरी दहाहजार रुपये देणगी, युवकांना उधोगासाठी मिळणारे दहा लाख रुपये, मुलिच्या लग्नासाठी ची देणगी व प्रसुती नंतरची देणगी असे अनेक तेलंगणा मॉडेल चे मुद्दे असलेले रामराज्य ची भुमिका घेऊन भारत राष्ट्र समिती संपुर्ण महाराष्ट्र राज्यात झपाटयाने वाढत आहे. भारत राष्ट्र समिती अगामी काळात महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थासह विधानसभा व लोकसभा स्वबळावर लढणार आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे लवकरच महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दौरा करणार आहेत. या दरम्याण प्रत्येक जिल्हात अनेक मोठे नेते व आजी - माजी आमदार, खासदार भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आघाडी व युती मुळे निवडणूकीची सधी न मिळणारे अनेक इच्छूक भारत राष्ट्र समिती पक्षात येण्याची शक्यता आहे. या सर्व अनुशंगाने प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमले आहेत. यापुर्वी महाराष्ट्राततील २८८ विधानसभेत प्रत्येक विधानसभे साठी समन्वयक नेमण्यात आले होते. यापुढे शेतकर्यांचे हीत व धाराशिव जिल्हाचा सर्वांगीन विकास हे धोरण घेऊन धाराशिव जिल्ह्यामध्ये भारत राष्ट्र समिती कार्य करणार आहे.