सदाशिवनगर प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरला 2021 - 2022 या वर्षीचा भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मार्फत दिला जाणारा बिमा ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत सदाशिवनगरला प्रदान करण्यात आला.
https://youtu.be/ZD-jtM_bFhg
यावेळी सदाशिवनगर या गावाच्या विकासासाठी 01 लाख रुपये बक्षीस पंढरपूर शाखेचे शाखाधिकारी डोईफोडे यांच्या हस्ते देण्यात आले सोबत उपशाखाधिकारी फणसाळकर अकलूज शाखेचे शाखाधिकारी आगवेकर , सांगोला शाखेचे शाखाधिकारी चौधरी आणि विकास अधिकारी निकम उपस्थित होते.
यावेळी डोईफोडे म्हणाले,की बिमा ग्राम पुरस्कार ग्रामीण भागात आयुर्विम्याचा प्रसार होऊन खेड्यातील किमान १०० लोकांनी विमाछत्र घेतल्यास त्या गावाला देण्यात येतो. त्या प्रमाणे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 100 नवीन ग्राहकांना विमाछत्र देण्यात आले.
यावेळी सदाशिवनगर गावचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ या सर्वांनी जे मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच हे उद्दिष्ट पूर्ण करू शकले.अशी माहिती सागर उरवणे यांनी सांगितली.यावेळी आभार विमा प्रतिनिधी सागर जयराम उरवणे यांनी मानले.