चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांची...गावभर डिजिटल तसेच ओल्या व सुक्या पार्ट्या,फटाक्यांची आतषबाजी करण्यापेक्षा एक एक पुस्तक आपल्या गावातील ग्रंथालयाला भेट देऊन आपले जीवन सार्थकी लावावे.
आज ग्रामीण भाग असो की शहरी भाग... नेत्यांच्या चमकोगिरी साठी लाखो रूपयांची उधळण कार्यकर्ते करीत असतात.अशी उधळण न कारता आपल्या नेत्यांचा वाढदिवस आपल्याच गावातील ग्रंथालय सुसज्ज करण्यासाठी हातभार लावलेला केव्हाही चांगला....हा बदल स्वतः नेत्यांनी स्विकारून उत्साही कार्यकर्त्याची मने परावर्तीत केलेली केव्हाही चांगली.
*याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भूगोल अधिविभाग प्रमुख व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. रामचंद्र पणदूरकर व त्यांच्या पत्नी हेमकिरण पणदूरकर (माई ) यांनी त्यांची एकमेव दिवंगत कन्या डॉ. रूपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठास दोन टप्प्यांमध्ये ६० लाख रुपयांचा निधी दिला. त्या निधीमधून ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरात दुमजली अभ्यासिका इमारत उभारण्यात आली आहे.*
अशी अभ्यासिका व त्या अभ्यासिकेला आवश्यक पुस्तके त्या गावातील लोकांनीही १० ,२० रूपयांची वर्गणी काढून केली तर पंचतारांकित ग्रंथालय उभी होतील. गोरगरीब मुलांना जगाचे व्यासपीठ आपण खुले करू शकतो...असे पुण्य जगाच्या पाठीवर कोणत्या ही ठिकाणी मिळू शकणार नाही.
गोरगरीब मुलांच्या वेदना कमी करून आपले दातृत्व व मातृत्वाची माया गावातील ग्रंथालयाच्या इमारतीला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा व पुस्तके तसेच व्यायामशाळेला आवश्यक तेवढा वित्तीय पुरवठा व जिम साहित्य भेट दिले तर आपल्याच गावातील तरुण मुले शारीरिक व बौद्धिक दृष्टीने स्मार्ट बनतील.गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा असेल.
ग्रामीण भागातील मुले कष्ट करण्यास व यशाच्या शिखरावर पोहण्यासाठी कधीही कमी पडत नाहीत.फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असते.अशी योग्य दिशा चांगले शिक्षण,आरोग्य व व्यायाम शाळा व क्रीडांगणे, ग्रंथालये मिळाली तर ग्रामीण भागातील मुले ऑलिम्पिक स्पर्धा १०० टक्के गाजवतील शिवाय जगाच्या ऑलिंपिक रँकिंग मध्ये भारत पहिल्या तीन मध्ये नक्कीच येऊ शकतो.
म्हणून ग्रामीण व शहरी भागातील लोकांनी नको तिथे पैशांचा अपव्यय न करता आपल्या भागात जो ग्रंथालय चालक,शाळा विद्यार्थी हितासाठी झटत असतील अशा ठिकाणी वर्गणीदार बनून किंवा स्वतः पुस्तके, व्यायाम शाळा साहित्य खरेदी करून भेट दिलेली केंव्हाही चांगले...मुले ही देवाघरची फुले असतात.ही फुले नेहमी टवटवीत ठेवायची असतील तर... अशा फुलांना बहरविण्यासाठी किमान एक पुस्तक किंवा व्यायाम शाळेतील साहित्य खरेदी करून दिले तर गावातील मुले शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनतील...गावाचा कायापालट होण्यास कधीच वेळ लागणार नाही.... शिवाय नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्क या देशांप्रमाणे आपल्या गावाचा मानवी विकास निर्देशांक उच्च होऊन राज्य व देशाला जगाच्या व्यासपीठावरील 132 व्या क्रमांकावरून पहिल्या 10 देशात आणण्यासाठी आपली महत्त्व पूर्ण भूमिका ठरेल... जाती धर्माचे लेबल लावून राजकारण करू पाहणाऱ्या लोकांना सर्वात मोठी चपराक बसेल.
शिवाय आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या, लोककल्याणासाठी झटणाऱ्या अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील भारत घडविण्यात आपला सुध्दा खारीचा वाटा असेल...तो खारीचा वाटा प्रत्येक नागरिकांनी उचलणे काळाची गरज आहे... नाही तर जाती धर्माच्या नावाखाली देशाला शिवाय आपल्याला माना खाली घालाव्या लागतील.
प्रा.आनंदा आलदर ✒️9765066247