पंढरपूर प्रतिनिधी
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे, राज्यातील ज्या त्या मतदारसंघातील विविध प्रश्न विधानसभेत ज्या त्या लोकप्रतिनिधींकडून मांडले जात आहे.. मात्र याबाबत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.समाधान अवताडे मात्र मतदारसंघातील प्रश्नांबाबत अध्याप गप्पच पहायला मिळत आहेत,आता यावरच रणजित बागल यांनी अवताडे यांचेवर टिका केली आहे.
आमदार महोदय, तालुका व मतदारसंघातील अनेक मोठमोठे प्रश्न आ वासुन उभे आहेत. मात्र आमदार अवताडे याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत, पंढरपुरातील काॅरीडाॅरचा प्रश्न आहे, तसेच तालुक्याच्या एमआयडीसीचा ही विषय महत्त्वाचा आहे मात्र यावर आमदार महोदय विधानसभेत बोलण्याचे औदार्य दाखवत नाहीत, मतदारसंघातील प्रश्नांबाबत आमदार महोदय अधिवेशन संपल्यावर बोलणार का..? असा सवाल बागल यांनी उपस्थित केला आहे.
आज तालुक्यातील जनतेला अनेक प्रश्न भेडसावत आहेत इतर मतदारसंघातील आमदार त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांबाबत संपुर्ण विधानभवन डोक्यावर घेतात.. आवाज उठवतात प्रसंगी गोंधळ करतात परंतु प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करतात परंतु आमदार अवताडे मात्र याला अपवाद आहेत. मतदारसंघातील जनेतच्या प्रश्नांबाबत अधिवेशनाचा निम्म्याहुन अधिक कालावधी संपुनही एखादा तारांकित प्रश्न अथवा लक्षवेधी देखील मांडायला आमदार महोदय असमर्थ ठरले आहे हा एकप्रकारे तालुक्यातील जनतेचा अपेक्षाभंग आहे अशी टिका देखील बागल यांनी यावेळी केली आहे.