पंढरपूर प्रतिनिधी
ऊसदर संघर्ष समितीच्या आंदोलनाची दखल आता प्रशासनाने घेतली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ऊस दर संघर्ष समिती सातत्याने उसाला पहिली उचल २५०० रुपये आणि फायनल बिल ३१०० रुपये मिळाले पाहिजे या मागणीसाठी मैदानात उतरली आहे.
आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागत आहे असे दिसतात सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाने सदर आंदोलनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदार व ऊस दर संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची मीटिंग जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे ३१/१०/२०२२ रोजी सकाळी १० वाजता नियोजन भवन, सात रस्ता सोलापूर येथे बैठक आयोजित केली आहे.अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी तेज न्यूज ला दिली.
या माध्यमातून ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने सर्व ऊस उत्पादक शेतकरी तोडणे वाहतूक करणारे वाहन मालक यांना विनंती करण्यात येते की प्रशासनाने आपल्या लढ्याची दखल घेतली आहे तरी आणखी थोडा संयम बाळगला व ऊस तोडी थांबवल्या तर आपल्याला चांगला दर मिळू शकतो त्यामुळे सर्वांनी संयम पाळावा असे आवाहन ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.